15 नोव्हेंबरला बिरसा मुंडा यांची जयंती ‘आदिवासी गौरव दिन’ म्हणून पाळणार; मोदी सरकारचा निर्णय 

नवी दिल्ली – केंद्रीय  मंत्रिमंडळाने 15 नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा यांची जयंती ‘आदिवासी गौरव दिन’ म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला. मंत्रिमंडळाच्या या निर्णयाचे वर्णन करून केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, श्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.
आपल्या ट्विटमध्ये श्री अमित शाह म्हणाले की,
“भारताच्या स्वातंत्र्य आणि समृद्धीमध्ये आपल्या जमातींचे मोठे योगदान आहे, त्यांनी आपल्या कष्टाने देशाच्या संस्कृतीचे आणि इतिहासाचे सिंचन केले आहे, परंतु दुर्दैवाने अनेक दशके आपल्या आदिवासी बांधवांना त्यांचे हक्क किंवा सन्मान मिळाला नाही”
“पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी त्यांना आदर आणि अधिकारही दिला”
“पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी आदिवासी वीरांचे शौर्य आणि इतिहास देशाच्या कानाकोपऱ्यात नेण्याचा मोठा प्रयत्न केला”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!