‘हॉरर’ चित्रपट आवडतात? मग, अवश्य वाचा ‘या’ संशोधनाचे निष्कर्ष….

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या ‘भयपटाचा (‘हॉरर मूव्ही’चा) सूक्ष्म परिणाम’ या शोधनिबंधाला श्रीलंका येथील आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेत ‘सर्वोत्कृष्ट प्रस्तुतकर्ता – प्रसारमाध्यम’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ‘हॉरर’ चित्रपट पाहिल्याने व्यक्तीच्या नकारात्मकतेत प्रचंड वाढ होते, असा निष्कर्ष महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संशोधनातून काढण्यात आला आहे.
आमच्या संशोधनाद्वारे आम्ही हेच जाणले की, ‘भयपट चित्रपट’ पाहिल्याने केवळ भावनात्मक परिणाम होत नसून सूक्ष्म स्पंदनांच्या स्तरावरही भयंकर परिणाम होतात. त्या परिणामांची आपल्याला जाणीवही नसते. सूर्यास्तानंतर वाईट शक्तींचा प्रभाव वातावरणावर अधिक असल्यामुळे त्या वेळी असले चित्रपट पहाणे अधिक धोकादायक असते, असे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे श्री. शॉन क्लार्क यांनी म्हटले आहे.
महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संशोधन विभागातील रुपेश रेडकर यांनी ही माहिती दिली असून त्या माहितीत म्हटले आहे की, आपण मनोरंजनासाठी चित्रपट पहातो; पण भयपट (‘हॉरर’) चित्रपट पाहिल्यानंतर सुटकेचा श्‍वास सोडून त्या चित्रपटाचा आपल्यावर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम झाला, याचा विचारही न करता आपण आपल्या कामाला लागतो; मात्र भयपटांचा परिणाम व्यक्तीवर मोठ्या प्रमाणात होत असून व्यक्तीच्या नकारात्मकतेमध्ये प्रचंड वाढ होते, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे श्री. शॉन क्लार्क यांनी केले. श्रीलंका येथील ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट’ने श्रीलंकेत आयोजित केलेल्या 8 व्या ‘सामाजिक विज्ञान परिषदे’त ते बोलत होते. त्यांनी ‘भयपट चित्रपट (हॉरर मूव्ही) सूक्ष्म परिणाम’ हा शोधनिबंध सादर केला. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक आहेत, तर श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत.
महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने हे 80 वे सादरीकरण होते. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आतापर्यंत 15 राष्ट्रीय आणि 64 आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर करण्यात आले आहेत. 7 आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंधांना ‘सर्वोत्कृष्ट पुरस्कार’ मिळाले आहेत.
 श्री. क्लार्क यांनी ‘प्रभावळ आणि ऊर्जा मापक यंत्र’ (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)), बायोवेल (Biowell), आणि सूक्ष्म परीक्षण यांच्या माध्यमातून ‘भयपट’ (हॉरर मूव्ही) यांचे होणारे सूक्ष्म परिणाम अभ्यासण्यासाठी केलेल्या संशोधनाबद्दल दिलेली माहिती पुढे दिली आहे.
 लोकप्रीय ‘भयपट चित्रपट’ पहाण्यासंदर्भातील प्रयोग : प्रयोगशाळेतील स्टुडिओमध्ये 17 व्यक्तींना भयपट चित्रपट दाखवला. एका गटाने तो चित्रपट दुपारी पाहिला आणि दुसर्‍या गटाने रात्री पाहिला. यूएएस उपकरण व्यक्तीची सकारात्मकता आणि नकारात्मकता दर्शवते; म्हणून चित्रपट पहाण्यापूर्वी आणि पाहिल्यानंतरही प्रभावळीची नोंद घेण्यात आल्या. बायोवेल उपकरण मानवाच्या चक्रांमधील शक्तीची स्थिती/क्षमता दर्शवत असल्याने त्या उपकरणाद्वारेही चाचणी करण्यात आली.
 ‘यूएएस’द्वारा केलेला ‘भयपट चित्रपटा’चा प्रभावळीवर (ऑरावर) होणारा परिणाम : नकारात्मकतेत सरासरी 107 टक्के वाढ झाली होती, म्हणजे वाढ दुप्पट झाली. काहींच्या बाबतीत ती वाढ 375 टक्के इतकी होती. प्रयोगापूर्वी ज्या व्यक्तींची प्रभावळ (ऑरा) सकारात्मक होती. त्यात 60 टक्के घट आढळली, तर काहींची सकारात्मक प्रभावळ समूळ नष्ट झालेली आढळली.
दुसर्‍या दिवशी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसारही त्यांची प्रभावळ (ऑरा) पूर्ववत झाली नव्हती. खरेतर तो चित्रपट पहाण्यापूर्वी असलेल्या त्यांच्या प्रभावळीतील नकारात्मकतेत सरासरी 55 टक्के वाढच दिसली. ज्या व्यक्तींनी रात्री तो चित्रपट पाहिला होता, त्यांच्या नकारात्मकतेत, ज्यांनी चित्रपट दुपारी पाहिला होता त्यांच्या 31 टक्केच्या तुलनेत 112 टक्क्यांनी वाढ झालेली दिसली.
 बायोवेलद्वारा केलेला अभ्यास : चित्रपट पहाण्यापूर्वी एका व्यक्तीच्या केलेल्या चाचणीत तिची सर्व चक्रे सर्वसाधारण रेेेषेत होती. त्यांचा आकारही खूप मोठा होता, याचा अर्थ ती व्यक्ती स्थिर आणि ऊर्जावान होती. चित्रपट पाहिल्यानंतर मात्र तिची चक्रे अव्यवस्थित दिसली, त्यांचा आकारही लहान झाला होता, म्हणजे ती व्यक्ती अस्थिर आणि तिची सर्वसाधारण क्षमता कमी झालेली दिसली.
 ‘भयपट चित्रपटा’चे दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि कलाकार/नट यांच्या संदर्भातील संशोधन : आपली छायाचित्रे आपली स्पंदनेही टिपत असल्यामुळे त्या चित्रपटात भूमिका करण्यापूर्वी एक वर्ष, ती करतांना, त्याच्या प्रिमियरच्या वेळी आणि 1-2 वर्षांनंतर त्या कलाकारांची ‘यूएएस’द्वारा चाचणी करून नोंदी (रिडिंग्ज) घेण्यात आल्या.
    काळ जाता जाता दिग्दर्शकाची प्रभावळ अधिकाधिक नकारात्मक होत गेली. त्यातील मुख्य कलाकाराची प्रभावळ खूप नकारात्मक होती. 2 कलाकारांची त्या चित्रपटामुळे वाढलेली नकारात्मकता त्यानंतर कधीच सुधारली नाही. पटकथा लेखकांचा नकारात्मक प्रभावळ सर्वाधिक होती. चित्रपटापूर्वी त्यांची प्रभावळ 59 मिटरवरून सुरू होऊन ती चित्रपटानंतरच्या प्रिमियरच्या 3 वर्षांतील 2 र्‍या भागात (सिक्वेेेल) 84 मिटरवर गेली होती. या सर्वांमध्ये कोणाचीही प्रभावळ सकारात्मक नव्हती. अशा नकारात्मक व्यक्ती आपल्या प्रभावाने पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार यांना समाजात नकारात्मकता पसरवणारे चित्रपट निर्माण करण्यास प्रवृत्त करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!