खासदार राजू शेट्टी यांची प्रकाशा येथे 28 रोजी ऊस परिषद

नंदुरबार –  ऊस केळी पपई उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून चाललेली लूट आणि महावितरणणकडून देखील शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूक यावर आवाज उठवून शेतकऱ्यांना संघटित करण्यासाठी व हे प्रश्न सोडविण्यासाठी दि. 28 रोजी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथे ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती घनश्याम चौधरी यांनी पत्र परिषदेत दिली.
नंदुरबार जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर प्रश्न प्रलंबित आहेत. ते आद्यपपपर्यंत सुटलेले नाहीत. त्याचप्रमाणे पपई व केळी उत्पादकांचे देखील प्रश्न प्रलंबित आहेत. ऊस, केळी व पपई उत्पादकांचे प्रश्न सुटावेत यासाठी यासाठी गेल्या काही वर्षांपासून संघटना लढा देत आहे. त्यानुसार समाधानकारक भाव मिळत होता. मात्र सध्या गेल्या दोन वर्षांपासून पपई उत्पादकांची व्यापाऱ्यांकडून लूट होत आहे. समाधानकारक भाव मिळत नाही. महावितरणणकडून देखील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. यामुळे विविध प्रश्न सोडविण्यासाठी दि. 28 रोजी माजी खा.राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती घनश्याम चौधरी यांनी पत्र परिषदेत दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!